HW News Marathi
राजकारण

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

मुंबई | मंदिर-मस्जिद यांना मदत देण्याची सरकारची प्रथा असताना ही प्रथा मोडीत काढत सरकार त्यांच्या तिजोरीवरच हात मारण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याच्या तिजोरीतून मंदिर, मस्जिद आणि दर्गा यांना मदत देण्याची प्रथा पूर्वीपासून होती. मात्र या सरकारचा कारभार अजब आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना साई संस्थानाच्या तिजोरीवर हात मारत आहेत. आणि उलट परिस्थिती निर्माण करत आहेत असेही यावेळी नवाब मलिक म्हणाले.

सातवा वेतन आयोग देताना ही सगळी परिस्थिती पाहिली तर ५ लाख कोटीचे कर्ज या राज्यावर आहे. चार वर्षात राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे काम राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगासाठी पैसे सरकार कसे निर्माण करणार आहे. याबाबत लोकांच्या मनात शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

विकास कामे करताना लोकांना सांगत आहे अडीच लाख कोटीचे कर्ज घेतले आहे. अडीच लाख कोटीचे कर्ज घेवून जी मेट्रोची कामे केली जात आहेत, ती विशेष ठेकेदारांना देवून टक्केवारी घ्यायची आणि काळया यादीतील ठेकेदाराला काम देवून काम करुन घेणे म्हणजे मोठा भ्रष्टाचार करण्याचा उदयोग सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण! – मुख्य निवडणूक अधिकारी

Aprna

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे! – अजित पवार

Aprna
राजकारण

आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर…सरकार दिशाभूल करतेय !

News Desk

मुंबई | २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचे आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

६ डिसेंबर असेल किंवा १४ एप्रिल असेल त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे खोदकाम फक्त करण्यात येते त्याव्यतिरिक्त तीन वर्षात काहीच काम स्मारकाचे झाले नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

खरंतर यांना इंदू मिल जागेवर बाबासाहेबांचे स्मारक बांधावयाचे आहे का ? हे स्पष्ट होत नाही. पंतप्रधानांनी तीन वर्षापूर्वी भूमिपूजन केले. निवडणुकीमध्ये फायदा मिळवण्यासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तरीही तीन-तीन वर्ष स्मारकाचे काम होत नाही. देशभरातील दलित भाजपविरोधात आहे, असे चित्र दिसतेय. त्यामुळे हे काम अडकवून ठेवण्याचा डाव भाजपचा किंवा सरकारचा घाट आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

दरम्यान मुंबईतील इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Related posts

गरीबांचा विचार भाजप करत नाही | उद्धव ठाकरे

News Desk

पंतप्रधानांनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

News Desk