HW News Marathi
राजकारण

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत !

नवी दिल्ली | “खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कारभारावर जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीचा इतका अभ्यास करतात. तरीही मग न्यायालयासमोर त्यांचे सरकार फेल कसे होते ?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत घटनादुरुस्ती केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करण्यास मंगळवारी (२७ मे) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र, आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मायावतींसह अखिलेश यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

News Desk

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk