HW News Marathi
राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कैलास पाटलांचे उपोषण मागे

मुंबई | उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी तात्पुरते स्थगित केले आहे. कैलास पाटील यांनी आज (30 ऑक्टोबर) म्हणजे सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. कैलास पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकासान झाले. त्याचे लवकरात लवकर पैसे देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तर आज सकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

दरम्यान, उस्मानाबादमध्ये 2020 मधील पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी कैलास पाटील यांनी आठवड्याभरापूर्वी उपोषण सुरू केले होते. दिवशी वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला 1200 कोटी रुपये यावे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल नुकसानाची भरपाई मिळवी, यासाठी त्यांनी कैलास पाटील यांनी उपोषणाला बसले होते.

कैलास पाटील यांच्या उपोषणाला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीव अंबादास दानवेंनी त्यांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली. आणि उपमुख्यमंत्री विमान कंपनीशी बैठक घेऊन 1200 कोटी रुपया यासंदर्भात चर्चा करणे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकासान झाले. त्याचे लवकरात लवकर पैसे देऊ, असे आश्वास त्यांनी दिले. यानंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

News Desk

मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे !

News Desk