HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली | त्रिशंकू विधानसभा, जेडीएस-काँग्रेसची निवडणुकीनंतरची युती, सत्ता स्थापनेचे दावे, त्यानंतर भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांनी केलेले आरोप-प्रत्यारोप, राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि त्यानंतर पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी, अशा नाट्यपूर्ण घडामोडी कर्नाटकमध्ये घडत आहेत.

सत्ता स्थापनेसाठी कर्नाटकात राजकीय नाटक सुरुच आहे. सध्या यात भाजपानं आघाडी घेतली असून पक्षाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 105 वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

15 दिवसांमध्ये भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल

swarit

देशात मेल, एक्स्प्रेस, लोकल सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

News Desk

कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदार मुंबईच्या हॉटेलमध्ये

News Desk
मुंबई

ठाणे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक

News Desk

मुंबई | मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दु्र्दैवाने ‘लाईफ घेणारी लाईन’ ठरत आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबई लोकल आणि रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात ठाणे रेल्वे स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांचे बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

एक जानेवारी २०१८ ते १२ मे २०१८ या अवघ्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत ठाणे रेल्वे स्टेशनवर ११२ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ठाणे हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्टेशन असून याच स्थानकावर सर्वाधिक बळी गेल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाण्यानंतर क्रमांक लागतो तो मध्ये रेल्वेवरीलच कल्याण स्टेशनवर ११० प्रवाशांना अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली स्टेशन असून इथे १०७ प्रवाशांनी गेल्या साडेचार महिन्यांत जीव गमावला आहे. बोरीवली हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात ‘जीवघेणं’ स्टेशन ठरले आहे.कुर्ला स्थानक चौथ्या क्रमांकावर असून या रेल्वे स्टेशनच्या हद्दीत ८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत नवीन वर्षात एकूण ९७९ रेल्वेबळी गेले आहेत.

Related posts

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

News Desk

सुशांतची गर्लफ्रेंड रियाला धमकी देणाऱ्या दोघांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk