HW News Marathi
राजकारण

लक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी

पुणे | पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आणि पवार कुटुंबाचे जवळ असलेले लक्ष्‍मीकांत खाबिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. खाबिया यांनी अचानक आज (सोमवारी) आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्वांना प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना लक्ष्‍मीकांत खाबिया यांनी अनेक समाज कार्य केली आहेत. त्यांनी स्त्री भ्रूणहत्या आणि एड्स यासारख्या अनेक सामाजिक आणि संवेदनशील विषयावर सामाजिक प्रबोधनाचे कामही केले आहेत. लक्ष्‍मीकांत खाबिया यांनी एऩएसयुआयच्या अध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. पुढे त्यांनी पुणे जिल्ह्याचे एऩएसयुआयचे अध्यक्ष, खजिनदार अशी अनेक पदे भुषवली आहेत. शरद क्रीडा सांस्कृतीक प्रतिष्ठानद्वारा कला आणि क्रीडा क्षेत्रात काम करीत असलेल्या खाबिया यांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी”; जयंत पाटलांचा इशारा

News Desk

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० यापूर्वीच रद्द करायला हवे होते !

News Desk

हिवाळी अधिवेशन सुरू, सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये दहशतवादी-जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ८ नागरिकांचा मृत्यू

swarit

काश्मीर | काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील लर्रू परिसरात काल (२१ ऑक्टोबर)ला दशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. या चकमकीत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ५ जण जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलग्राम जिल्ह्यातील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कुलग्राममध्ये भारतीय लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार एका घरात दहशतवादी लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे भारतीय लष्करांनी ३ दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे.

या दहशदवाद्यांना ठार केल्यानंतर जमावाने लष्करावर दगडफेक केल्यानंतर देखील दहशतवादी लपलेल्या घरात घुसून त्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या दरम्यान त्या घरातील विस्फोटक फुटला. त्यामुळे ५ जणांचा जागीच ठार झाले. परंतु जवळपासचे ४३ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कुलग्राम, श्रीनगर व अनंतनाग जिह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी न जाण्याची सुचना वळोवेळी देऊन देखील नागरिक दशतवादी लपलेल्या घरात घुसण्याच्या प्रयत्न करत असताना एका स्फोटकाचा धमाका झाला.

 

 

Related posts

अखेर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले, भारतासाठी अत्यंत आनंदाचा क्षण

News Desk

नासाचेही गुरूला अभिवादन

News Desk

भारत-रशिया रायफल्स करार, अमेठीत उभारणार रायफल्सचा कारखाना

News Desk