HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

मुंबई | सध्या मुंबईत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार यांनी “मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातून निवडणूक लढविण्याचा काहीच प्रश्नच नाही, या शब्दात लोकसभा निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे सर्व उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ‘पुणे लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी’ असा आग्रह केला जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली होती. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा केला असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

swarit

गिरीश बापट यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली | उच्च न्यायालय

News Desk

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रविण दरेकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड

Aprna
देश / विदेश

मोदींसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली, काँग्रेसचा आरोप

Gauri Tilekar

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुपारी १ वाजता अजमेर येथे रॅली असल्याने निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. यासाठीची पत्रकार परिषद पूर्वनियोजित वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता होणार होती. मात्र या पत्रकार परिषदेच्या वेळात अचानक बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Related posts

देशभरात १ डिसेंबरपासून कुठेही उडवा ड्रोन

swarit

निपाह व्हायरसची दहशत, दिल्‍ली, गोवा, राज्यस्‍थानमध्ये सतर्कतेचा इशार

News Desk

सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

News Desk