HW News Marathi
राजकारण

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

मुंबई | महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी झटणारा ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे सोमय्या रुग्णालय येथे जाऊन आठवले यांनी अंत्यदर्शन घेतले. शहरी भागासोबतच विदर्भातील ग्रामीण प्रश्नांची पांडुरंग फुंडकर यांना चांगली जाण होती. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. लोकसभा सदस्य असताना त्यांच्याशी माझे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘शिर्डीमध्ये मोदींनी केला शेतक-यांचा इव्हेंट’

News Desk

“म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 सुरू,” संजय राऊतांची टीका

Aprna

सर्वण आरक्षणाचा लाभ घेण्यापूर्वी ‘या’ अटी जाणून घ्या 

News Desk
देश / विदेश

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक दहशवादाचे जनक

News Desk

नवी दिल्ली : राज्यस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स पुस्तकात बाळ गंगाधर टिळक हे दहशवादाचे जनक असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकामध्ये टिळकांबदल जे छापले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोड फुटले असून महाराष्ट्रात या प्रकरणाचे किती तीव्र पडसाद पडतील हे येता काळाच सांगू शकेल. या प्रकरणा बदल राजस्थान सरकार काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

धड्यात टिळकांबदल नेमके काय म्हटले

‘अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे.’ टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. राज्यस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरेन्स पुस्तकात असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात, असे या धड्यात म्हटले आहे. शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे देखील या धड्यात म्हटले गेले आहे.

Related posts

Union Budget 2021 | या ‘४’ राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा!

News Desk

काँग्रेसकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुमला दिनाच्या शुभेच्छा

News Desk

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम निकाल, सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

News Desk