HW News Marathi
राजकारण

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे!

मुंबई | वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १४ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी वनविभागावर टीका केली आहे. ‘वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे‘ अशी टीका टी-१ वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.

वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर वन्यजीव प्रेमींनी संशय उपस्थित केला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्ष नेताच उरणार नाही !

News Desk

आज संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक

News Desk

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk