HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

नवी दिल्ली | भाजपने छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देता नव्या लोकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. “लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपने विद्यमान अशा १० खासदारांना तिकीट न देता इतरांना संधी देण्याचे ठरविले आहे”, अशी माहिती छत्तीसगड भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने देखील या निर्णयाला मान्यता दिल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात होती. मात्र, भाजपला राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या ३ मोठ्या राज्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भाजपला छत्तीसगडमधील आपली सत्ता गमवावी लागली. याचा धसका घेत आता भाजपने छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे नवे गटनेते

Aprna

…म्हणून प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आली ३ वेळा शपथ घेण्याची वेळ

News Desk

काश्मीर विधानसभा बरखास्त, मुफ्तींचे राज्यपालांना पत्र

News Desk