HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : उमेदवारांनाच करावी लागणार आपल्यावरील गुन्ह्यांच्या माहितीची जाहिरात

विशाल पाटील-धनंजय दळवी । लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती ती देशातील सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे मिळणार आहे. या निवडणुकीच्या दरम्यान जे उमेदवार लोकसभेसाठी उभे राहतील त्यांना आपल्यावरील असलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती केवळ शपथपत्राद्वारेच नाही तर आपल्या मतदार संघात असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर करावी लागणार आहे. ही माहिती एक वेळ नाही तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंत तब्बल तीन वेळा जाहीर करावी लागणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी, मुंबईच्या फरोख मुकादम यांनी दिली आहे.

लोकसभेला उभे राहणाऱ्या राज्यातील प्रत्येक उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्याच्या माहितीची जाहिरात करावे लागणार आहे. यामुळे पहिल्यांदाच उघडपणे आपल्या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण पार्श्वभूमी ही मतदारांना आणि सर्वसामान्यांना कळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक चांगले उमेदवार निवडण्यासाठी त्यांना ही मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यासंदर्भातील माहिती स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात करण्याचे निर्देश दिले आहेत. यात उमेदवार नाव नोंदवताना फॉर्म नंबर 26 मध्ये आयोगाने बदल केले आहेत. ज्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करेल त्या दिवसापासून संबंधित उमेदवाराला आपल्या संदर्भातील संपूर्ण माहिती शपथपत्राच्या माध्यमातून आणि विविध वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जाहीर करावी लागणार आहे. मतदान होण्यापूर्वी तीन वेळा वेगवेगळ्या वर्तमानपत्र देणे देणे बंधनकारक आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी ठरवून दिलेल्या वर्तमानपत्रात आणि तारखांवरनुसार हे जाहिरात करावी लागणार आहे.यासोबतच ज्या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत त्या पक्षांनाही आपल्या उमेदवारांची माहिती आपल्या संकेतस्थळावर देणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांची राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमीही देणे आवश्यक आहे.

आयोगाने या लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग कमीत कमी होईल यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याचे मुकादम म्हणाल्या. उपाययोजना तर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्यास संदर्भात जे गुन्हे दाखल झाले होते होते, त्यावरही आयोगाने गांभीर्याने विचार करून त्याचा नुकताच आढावा घेतला आहे.या आढाव्याच्या माध्यमातून ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, अथवा आरोपपत्र दाखल झालेले आहे किंवा त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात दाखल करण्यात दिरंगाई होत आहे याचीही दखल घेतली असून त्यांच्यावर लवकरच कारवाईचे संकेत हे आयोगाकडून देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण

News Desk

आजपासून फैजाबादचे नाव बदलून अयोध्या !

News Desk

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

swarit