HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्यांना ओवेसींनी सुनावले

मुंबई | एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी आगामी निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना सुनावले आहे. “जर रमजानच्या महिन्यात लोक कामाला जाऊ शकतात, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत ?”, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने रविवारी (१० मार्च) आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांची मतदान प्रक्रिया ही रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेते आणि मौलवींनी थेट निवडणूक आयोगाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत तारखा बदलण्याची मागणीही केली होती.

“निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. आम्ही त्याचा आदरही करतो. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात काही बोलू इच्छित नाही. मात्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी या निवडणुका कठीण असतील. या तारखा रमजान महिन्यात ठेवण्यात आल्याने सर्वाधिक त्रास मुस्लिमांना होईल”, असे कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनी म्हटले होते. दरम्यान, “रमजान महिन्यात मतदान प्रक्रिया होण्याबाबत आपल्याला काहीच आक्षेप नाही”, असेही ओवैसी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

Aprna

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

News Desk

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

News Desk