HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : शिवसेना-भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग !

मुंबई | देशात आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात ११ एप्रिलपासून एकूण ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील. दरम्यान, या निवडणुकांसाठीची आचारसंहिता देखील १० मार्चपासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. शिवसेना आणि भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या सर्व बॅनर्स, जाहिराती, तसेच अन्य फलक काढून टाकणे बंधनकारक असते. मात्र, आता आचारसंहिता लागू होऊनही मुंबईसह उपनगरांमध्ये शिवसेना आणि भाजपचे बॅनर्स अनेक ठिकाणी दिसत आहेत”, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना आणि भाजपवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील संजय निरुपम यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेना युती कायम राहणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

आण्णा हजारेंचे चंद्रकांत दादांना पत्र

swarit

अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही?

News Desk