HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : माझी निवडणूक लढविण्याची इच्छा कायमच आहे !

मुंबई | “मी आजच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे. मी हे उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना दिली आहे. अर्जुन खोतकर यांनी आज (१६ मार्च) उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या समन्वयक म्हणून उपस्थित होत्या.

काहीच दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्यात गुप्त चर्चा झाली होती. “अर्जुन खोतकर यांच्याबद्दल दोन दिवसात गूडन्यूज मिळेल”, असे अब्दुल सत्तार यांनी या भेटीनंतर म्हटले होते. त्यामुळे खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या. “मी काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. औरंगाबाद येथील बैठकीत रविवारी (१७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल”, असे अर्जुन खोतकर यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. खोतकर आणि दानवे यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठक होत आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे जालन्यातून नेमके कोण लढणार याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk

स्वप्ने अशीच दाखवा जी पूर्ण करता येतील, गडकरींचा भाजपला घरचा आहेर

News Desk

शिवसेना-वंचित युतीचा फायदा कुणाला? प्रबोधनकार ठाकरेंपासून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ प्रयोग

Manasi Devkar