HW News Marathi
राजकारण

शपथ घेताच कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

भोपाळ | कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताल्यानंतर मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतच कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अवघ्या १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचेआश्वासन दिले होते. नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या शपथविधी समारंभानंतर अवघ्या तासाभरात काँग्रेसनं या आश्वासनाची पूर्तता केली आहे.

कमलनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाचा लाभ २ लाखांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये ४१ लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर ५६,३७७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील जवळपास १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात गेले आहे. कमलनाथ यांचा शपथविधी सोहळा भोपाळमधील जांबुरी मैदानात संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमधील ३ फुटीरवादी नेत्यांना १० दिवसांची एनआयए कोठडी

News Desk

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

News Desk

#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा

News Desk