HW News Marathi
राजकारण

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील जनतेने भाजप-महायुतीच्या बाजूने कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला या दोन मुद्द्यांवरून या दोन्ही पक्षांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असेही समीकरण राज्यात बनू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. राज्यातील याच परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सोमवारी (४ नोव्हेंबर) दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर आज (५ नोव्हेंबर) शरद पवार मुंबईत पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

“राष्ट्रवादीकडे अद्याप सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेली नाही. सोनिया गांधींना आपण राज्यातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली”, अशी माहिती शरद पवार यांनी या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोनिया गांधींसोबतच्या भेटीनंतर उद्या आपण मुंबईत पक्षातील नेत्यांशी चर्चा करू. त्यानंतर पुन्हा सोनिया गांधींची भेट घेऊ अशी माहिती शरद पवारांनी यावेळी बोलताना दिली. त्याप्रमाणे, राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून आज मुंबईत राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या नेत्यांसह शरद पवार यांची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे सध्या या बैठकीकडे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

Aprna

बीजेपी से बेटी बचाओ

News Desk