HW News Marathi
राजकारण

दिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (३० मे) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, लोकसभेत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच या दोन नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेली ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यासाठीची असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीकडून राहुल यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्याचप्रमाणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली जाऊ नये, अशीही आग्रही मागणी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे.

लोकसभेच्या अधिकृत विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न

लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान ५५ खासदार असणे आवश्यक आहे. मात्र, काँग्रेसकडे सध्या फक्त ५१ खासदार आहेत. तर राष्ट्रवादीकडे ५ खासदार आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस जर काँग्रेमध्ये विलिन विलीन झाले तर खासदारांचे संख्याबळ ५५ हून अधिक होईल. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नव्हते. यंदाही त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते | मोहन भागवत

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट

News Desk

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk