HW News Marathi
राजकारण

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

नवी दिल्ली | मीटू मोहिमेतून एका महिला पत्रकारने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिला पत्रकाराविरोधात अकबर यांनी मानहानीचा दावा केला आहे. अकबर यांनी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जवळपास ९७ वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अकबर यांच्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. यात केवळ ३५ महिला वकील असून या ९७ वकीलांपैकी केवळ ६ विकलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असे करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप १० महिलांनी केला आहे.

मात्र हे आरोप खोटे असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनेच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. अकबर यांनी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व महिलांना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. या महिलांसाठी न्यायालयात खेचले असून यांच्या विरोधात न्यायालयात ९७ वकीलांची फौज सज्ज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारसदार !

News Desk

अमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk

“काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम”, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला

Aprna
राजकारण

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

News Desk

मुंबई | पेट्रोल डिझेल ची दरवाढ रद्द झाली पाहिजे. वाढते इंधन दर रोखले पाहिजेत ही सामान्य जनतेची भावना योग्य असून इंधन दरवाढ कमी करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. इंधन दरवाढ सहित सर्व प्रश्नांवर आपण नेहमी जनतेच्या भावना समजून घेतल्या आहेत त्यामुळे इंधन दरवाढ बद्दल बोलताना आपला कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता. आपण नेहमी जनभावनेप्रति संवेदनशील आहोत त्यामुळे माझ्या वक्तव्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला.

काल जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत इंधन दरवाढ बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केलेल्या विधानावरून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अधिकृत खुलासा करून दिलगिरी व्यक्त करून इंधन दरवाढ बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. इंधन दरवाढीचा रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढी मुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागतो. सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेच आपण नेहमीच आदर राखला आहे. आपण सामान्य जनतेतूनच आडीअडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत त्यामुळे सामान्य जनतेचे नेमके प्रश्न आपल्याला चांगले माहीत आहेत आणि आपण त्या खस्ता खाल्ल्या आहेत. त्या व्यथा अनुभवल्या आहेत.

त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही. इंधन दरवाढबाबत विचारण्यात आलेला प्रश्न हा माझ्या व्यक्तिगत स्तरावर विचारला होता मात्र इंधन दरवाढीबाबत जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल जेथे जेथे थेट विचारले जाते तेथे माझे उत्तर हे इंधन दरवाढ रद्द करावे असेच असते तसेच सामान्य जनतेची जी मागणी असते तीच मागणी माझा रिपब्लिकन पक्ष करीत आला असून आपण ही सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलेलो आहोत असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी आज केले.

इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाने हे इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे रामदास आठवले यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

Related posts

रायगडमध्ये संशयास्पद बोटीचा दहशतवादी अँगल दिसून येत नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

News Desk

किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला ते पाकिस्तानात स्वतः जाऊन शोधा !

News Desk