HW News Marathi
राजकारण

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई। तब्बल दोन वर्षानंतर राज्यभरात दहा दिवस गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. राज्यभरात आज अनंत चतुर्दशी (anant chaturdashi)
 लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्व सर्वसामान्यांपासून ते कलाकार देखील यात सामील झाले आहेत. आता यात राजकीय नेते मंडळी सुद्धा अपवाद राहिले नाही. मुंबई आणि पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले असते.
दरम्यान, पुण्याच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशाच्या जल्लोषात निरोप दिला जातो. पुण्याच्या मिरवणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सहभागी झाले. या दोघांनी राजकीय मतभेद विसरून कसबा गणपतीची पालखी एकत्रच उचलली. यावेळी दोघे एकमेकांशी गप्पा मारताना देखील दिले.
यावेळी आदित्य ठाकरेंनी राजकारणावर फार बोलणे टाळले असले तरी राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना म्हणाले, “राज्याचे आजचे राजकारण खूप वाईट सुरू असून हे राजकारण राज्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगले नाही. राजकारणाची पातळी खाली खालावली आहे. ती वरती आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, ” असे ते यावेळी म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांनंतर मुख्यमंत्री घेणार नितीन गडकरींची भेट

News Desk

“मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही”, पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला

Aprna

“…पिढ्यांनपिढ्या ही गद्दारी त्यांना शांतपणे जगू देणार नाही”, संजय राऊतांची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna