HW News Marathi
राजकारण

शेतक-यांना नाही तर सरकारमधील मंत्र्यांना मानसोपचाराची गरज !

अकोला | दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील १७ हजारांहूनही जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतक-यांना मदत करून आत्महत्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सरकारने शेतक-यांना मानसोपचार घ्यायला सांगून शेतक-यांची क्रूर चेष्टा केली आहे. शेतक-यांना नव्हे तर सरकारमधील बेताल मंत्र्यांनाच मानसोपचाराची गरज आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यातील चौथ्या दिवसाची सुरुवात वाशिम येथून झाली. जनसंघर्ष यात्रा रिसोडला पोहोचल्यानंतर जागोजागी गावक-यांनी जनसंघर्ष यात्रेचे स्वागत केले. अशोक चव्हाण यांनी रिसोड तालुक्यातील किणखेडा येथील शेतात जाऊन शेतक-यांशी चर्चा केली रिसोड आणि अकोला शहरातील जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असून अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. लोकांना प्यायला पाणी नसताना सरकार पाण्याचे टँकर सुरु करण्याऐवजी सकाळी ८ वाजल्यापासून दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देत आहे. कर्जमाफीची घोषणा करून वर्ष उलटून गेले तरी शेतक-यांच्या हाती काही पडले नाही. पीक विमा नाही. शेतमालाला भाव नाही, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये. शेतक-याने रूमणे हातात घेतले तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असा इशारा देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-ठाकरे गटामध्ये झालेल्या ‘त्या’ राड्यात सरवणकरांच्या बंदुकीतून गोळी सुटली; अहवालातून स्पष्ट

Aprna

‘मविआ’चे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार’; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Aprna

साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk