HW News Marathi
राजकारण

मंत्रालय झाले ‘आत्महत्यालय’ – राज ठाकरे

मुंबई | ‘राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडी सरकारपेक्षा आमचे सरकार वेगळे दावा करुन भाजपा सरकार सत्तेत आली. खरेच हे सरकार राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार यांच्यापेक्षा वेगळेच आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालाय’ झाले आहे.’ अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात जात होते. पण, भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयात येतात. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा एका तरुणांने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षात मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होता दिसत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

साध्वी प्रज्ञा यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

News Desk

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवींची साडे चार तास चौकशी

Aprna
राजकारण

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

मुंबई | धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदी वादात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे नाव आले असून हा वाद ताजा असतानाच पुन्हा दुसऱ्या वादात रावल यांचे नाव येत आहे. तोरणमाळ येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकयदेशीररित्या ताब्यात घेतल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक केला आहे. त्यामुळे सरकारने जयकुमार रावल यांच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने नंदूरबार येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट १५ वर्षासाठी दरमहा १५ हजार रुपये भाडेतत्त्वावर चालवायला घेतले होते. पुन्हा भाडेकरार करुन २००६ पर्यंत घेतले होते. पण, २००६मध्ये एमटीडीसी कंपनीने भाडेच न भरल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला नोटीस पाठवून थकविलेले भाडे व्याजासह भरा नाहीतर रिसॉर्ड खाली करण्याची नोटीस पाठवली. कंपनीने याला कोणताही प्रतिसाद तिला नाही.

औरंगाबाद खंडपीठात कंपनी विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘आम्ही रिसॉर्टच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये खर्च केल्याचा दावा करत. या रकमेची मागणी कंपनीने एमटीडीसीकडे केली. पण, कोर्टाने पैसे भरुन रिसॉर्टचा ताबा सोडण्याचे आदेश’ दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

Related posts

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावरच होणार !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ कृतीचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Aprna

सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

News Desk