HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी | मनमोहन सिंग

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रुथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्याचे सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये शेतकरी आणि तरुण त्रस्त आहेत. तर दलित आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारला पर्याय शोधण्याचा आणि विचार करणे आवश्यक आहे. असे मनमोहनसिंग यांनी म्हटले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रुथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांसमवेत डॉ. मनमोहन सिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच यावेळी या पुस्तकाचे कौतूकही डॉ. सिंग यांच्याकडून करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे मोदी सरकारचे समग्रु विश्लेषण आहे. सरकारचा नाकर्तेपणाचा आरसा म्हणजे हे पुस्तक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानासाठी नाॅट रिचेबल असणारे रविकांत तुपकर भाजपला रिचेबल .. तुपकरांचा स्वाभिमानीला रामराम !

News Desk

‘महापोर्टल’ बंद करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

News Desk