HW News Marathi
राजकारण

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

पंढरपुर | पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा खोटा कांगावा असुन कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्यावरचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे केले जात आहे. असा आरोप पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडेंनी पंढरपुर येथे एका पत्रकार परीषदेत केला आहे.

मोदी व फडणवीस हत्येचा कटाची चौकशी ही सरकारी यंत्रणांकडुन न करता स्कॉटलंड यार्ड सारख्या निपक्षपाती तपास करण्यात यावे. तसेच एखाद्याचे नाव गुन्ह्यात अडकवन पोलिसांसाठी अत्यंत सोपी बाब असल्याचेही कवाडे म्हणाले.

येल्गार परीषदेचा संयोजकांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरुन जो गुन्हा दाखल केलाय त्याचाही त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. भिडेंवर कारवाईची मागणी केल्यावरच मोदी -फडणवीस हत्येचा कट रचला जात असल्याची माहीती पोलीस देतात यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानहानी प्रकरण: राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोणी आहे का!

News Desk

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?

Aprna