HW News Marathi
राजकारण

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

पंढरपुर | पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा खोटा कांगावा असुन कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्यावरचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे केले जात आहे. असा आरोप पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडेंनी पंढरपुर येथे एका पत्रकार परीषदेत केला आहे.

मोदी व फडणवीस हत्येचा कटाची चौकशी ही सरकारी यंत्रणांकडुन न करता स्कॉटलंड यार्ड सारख्या निपक्षपाती तपास करण्यात यावे. तसेच एखाद्याचे नाव गुन्ह्यात अडकवन पोलिसांसाठी अत्यंत सोपी बाब असल्याचेही कवाडे म्हणाले.

येल्गार परीषदेचा संयोजकांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरुन जो गुन्हा दाखल केलाय त्याचाही त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. भिडेंवर कारवाईची मागणी केल्यावरच मोदी -फडणवीस हत्येचा कट रचला जात असल्याची माहीती पोलीस देतात यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

Aprna

 राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमध्ये ‘नो एन्ट्री’

News Desk

बेस्टच्या संपाचा आज पाचवा दिवस, बेस्ट कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk
राजकारण

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk

मुंबई | भिमाकोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या नेत्यांच्या भूमिकांवरून राज्यभर वादळ उठले होते. मात्र प्रचारकी उडालेला धुरळा निवळल्यानंतर दलित आणि मराठा यांच्यात वाद लावून दरी वाढविण्यापेक्षा वाद मिटवून सामाजिक एकोपा निर्माण करणे हिताचे असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका योग्य असल्याची तरुणांना पटले आहे. त्यातून प्रबोधन झाल्याने मुंबईतील अनुशक्तीनगर येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सोडून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारिप बहुजन महासंघ सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची मुंबई ठाणे नाशिक आदी जिल्ह्यांतून रामदास आठवलेंच्या संविधान बंगल्यावर रांग वाढू लागली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशीर्वाद घरून गणेश गांगुर्डेनी रिपाइं जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश घोक्षे, महावीर सोनवणे,लिंबराज गायकवाड, रमाकांत शिरोळे, दिनेश शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची भूमिका योग्य असल्यानेच आपण रिपब्लिकन पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे मनोगत गणेश गांगुर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

Related posts

मोदींचे सरकार संविधानाचा गौरव करणारे सरकार

News Desk

सर्वोच्च न्यायालयाकडून खासदार मनोज तिवारी यांची कानउघाडणी

Gauri Tilekar

हज यात्रेकरूंच्या तिकिटांवर जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार | आठवले

News Desk