HW News Marathi
राजकारण

गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली !

नवी दिल्ली | “गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली आहे”, असा दावा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केला आहे. सच्चर समितीच्या अहवालाचा दाखल देत विजय रुपाणी म्हणाले कि, “भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे”.

विजय रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला आज (२६ डिसेंबर) १ वर्ष पूर्ण होत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय रुपाणी यांच्याकडून तब्बल ६६६ कोटींच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यावेळी काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे. “काँग्रेसकडून कायमच हिंदू आणि मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो”, असा आरोप देखील विजय रुपाणी यांनी केला. ते राज्य वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने देशाला नवी दिशा मिळाली !

News Desk

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

News Desk

मुंबई | भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. हा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय स्तंभाच्या जागी ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विजय स्तंभास ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान हजारोंच्या संख्येने नागरिक भेट देणार आहेत. त्यामुळे या पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रम पार पाडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करुन देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. ही विनंती मान्य करत न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे.

गतवर्षी याच ठिकाणी भीमा कोरेगाव परिसराजवळ झालेल्या दंगलीच्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उसळले होते. त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने यंदाचा हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या नियोजनात पार पाडण्याचे ठरवले आहे.

 

Related posts

पुणे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार! –  दिलीप वळसे-पाटील

Aprna

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

उदयनराजे म्हणाले, “काय बाई सांगू?”; शिवेंद्रराजेंनी विचारलं, “तुम्हाला लाज…”

News Desk