HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे अन् माझ्यात कोणतीही भिंत नाही !

मुंबई | यंदाच्या विधानसभा निवडणुकानंतर राज्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली. विधानसभेत शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या संघर्षानंतर ही युती तुटून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सरकार स्थापन झाले. यादरम्यान, अनेक उलट-सुलट राजकीय घडामोडी घडल्या. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण सत्तापेचावर भाष्य केले आहे. यावेळी “काहीही झाले तरी माझी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मैत्री आजही कायम आहे. आमच्या मैत्रीत कोणत्याही प्रकारचा दुरावा आलेला नाही”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

“राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला. मात्र, तरीही राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत येऊ शकले नाही. त्यानंतर आता राज्यात सत्तेत असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या सरकारकडून आम्हाला विकासकामांच्या अपेक्षा आहेत. राज्यातील हे तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले सरकार किती काळ चालेल याची कल्पना नाही. मात्र, काहीही झाले तरीही माझ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीत दुरावा आलेला नाही. आमची मैत्री आजही कायम आहे, यापुढेही कायम राहील. उद्धव ठाकरेंनीही कधी तोडण्याची भाषा केली नाही. मीही कधी त्या पद्धतीचे भाष्य केले नाही. आमच्यात कोणतीही भिंत नाही”, असे देवेंद्र फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.

नव्या सरकारला वेळ देणार पण…!

“आता राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नवे सरकार स्थापन झाले आहे. माझे मित्र उद्धव ठाकरे हे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. त्याप्रमाणे, आम्ही राज्यातील या नव्या सरकारला वेळ देणार आहोत. मात्र, या नव्या सरकारकडून आम्हाला विकासकामांची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे, त्यांनी जर विकासकामांवर भर दिला आणि चांगले निर्णय घेतले तर त्याचे आम्ही स्वागतच करू. परंतु, त्यांनी जर कोणते चुकीचे निर्णय घेतले तर आम्ही त्यांना धारेवर देखील धरणार आहोत”, असेही मुख्यमंत्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

News Desk

‘साद घातली तर येऊ देत…,’ शर्मिला ठाकरेचे सूचक विधान

Aprna

गडचिरोलीत आज ४ मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

News Desk