HW News Marathi
राजकारण

मुंढेच्या बदलीचा आनंद व्यक्त करणे नाशिक महापौरांना पडणार महागात

नाशिक | नाशिकमधून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर तेथील भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या बंगल्यासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता. या प्रकारामुळे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात महापौर भानसी यांच्या विरोधात नाशिककरांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या बदलीचा आनंद व्यक्त करणे महापौर रंजना भानसी यांना महागात पडणार आहे.

न्यायालयाने आखून दिलेली वेळ न पाळता दुपारी १२ वाजता फटाके फोडून महापौर भानसी यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे असा आरोप नाशिककरांनी या तक्रारीत करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडल्यानंतर लगेचच भाजप कार्यकत्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाके फोडत तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत आनंद व्यक्त केला.

तुकाराम मुंढे हे नाशिक महापालिकेचे आयुक्त होते. मात्र गुरुवारी त्यांची नाशिकहून बदली करण्यात आली असून मुंबईत मंत्रालयात सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अाॅगस्ट महिन्यात मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेत्यांना समज देत हा ठराव मागे घ्यायला लावला हाेता. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk

प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत ? काँग्रेसला मोठा झटका

News Desk
राजकारण

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk

लखनऊ | अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात राजकारण चांगलेच तापले आहे.’आम्ही १७ मिनिटांमध्ये बाबरी मशीद तोडली मग कायदा बनवायला किती वेळ लागतो ?’, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपती भावनपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपचे सरकार आहे. राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील आणि जे विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे देखील कठीण होईल, असा धमकी वजा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २५ नोव्हेंबरला अयोध्येत दाखल होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच संजय राऊत यांच्या या विधानामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Related posts

#MarathaReservation : मराठा आरक्षण तातडीने रद्द करा !

News Desk

पुन्हा एकदा शहांच्या पश्चिम बंगालमधील सभेला परवानगी देण्यास ममतांचा नकार

News Desk

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk