HW News Marathi
राजकारण

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये लिहिलेल्या आजच्या अग्रलेखामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. आजच्या ‘सामना’मधून अजित पवार यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. यामुळेच आक्रमक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी सामनाचे अंक जाळण्यात आले.

शिवसेनेने राम मंदिर बांधू असे जाहीर केले होते. मात्र ‘ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ?’ असा खोचक सवाल विचारत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ‘सामना’तर्फे आज अग्रलेखात अजित पवार यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सामनाच्या पुण्यातील कार्यालयाजवळील आंदोलन केले.

सामनाने अजित पवार यांच्याबद्दल नेमके काय लिहिले ?

अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. शिवसेना सरकारमध्ये बसून महाराष्ट्रातील दुष्काळावर काय करते ?, अशा अत्यंत खालच्या पातळीची टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

News Desk

भारतात धर्मविरोधी वक्तव्यांवर कारवाई का होत नाही ?

News Desk

चिता पेटत होती अन् सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती !

News Desk
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

Gauri Tilekar

नवी दिल्ली । रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आजपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र करार होणार असल्याची माहिती मिळत आहे. या करारासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार ५अब्ज डॉलरचा असणार आहे. पुतीन हे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे.

भारताने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत-रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची ही भारतभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ साली मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेसाठी रशिया भारताला प्रशिक्षण देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौ-यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भात पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातअधिकृत चर्चा करणार आहेत, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्येदेखील रशियाचा समावेश आहे.

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

News Desk