HW News Marathi
राजकारण

साताऱ्यातील पावसाचा एक राजकीय बळी !

मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकीसह गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या देखील निकाल जाहीर झाले. या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे श्रीनिवास पाटील अशी हि लढत होती. या निवडणुकीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना अत्यंत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. “यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात २७ बळी घेतले. साताऱ्यातील पावसाने एक राजकीय बळी घेतला, त्याचं नाव उदयनराजे भोसले”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंनी खिल्ली उडवली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानांतर देखील जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

त्यावेळी, “उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, तुम्हाला काय मिळालं ?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला होता. त्यानंतर आता सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी थेट उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसात झालेल्या सभेचा उदयनराजेंना मोठा फटका बसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली | नरेंद्र मोदी  

News Desk

पंतप्रधानांकडे आता प्रचारासाठी कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत !

News Desk

शहीद कर्नल महाडिक यांच्या वर्गमित्रांची सैन्याला अनोखी दिवाळी भेट

Gauri Tilekar