HW News Marathi
राजकारण

“विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटली,” मिटकरींचा खळबळजन आरोप

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटले आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींनी बारामतीमध्ये शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिंदे सरकार दीड महिन्यापेक्षा जास्त काळ टीकणारन नाही, असा दावा मिटकरींनी केला आहे. मिटकरींच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे

मिटकरी म्हणाले, “विधान परिषेदच्या निवडणुकी झाली. यात एका पक्षाची तीन मते फुटली असून एका मताला 21 कोटी रुपये दिले आहे. मग, 27 मते द्यावी लागतात. 27 गुणिले 3 मी गुणाकार केला तर161 कोटी झाली आहे. आपल्या जमिनीच्या किंमत 5 लाख एकर आहे. 4 एकर विकल्यावर 20 लाख येतात. हा पैशांचा घोडेबाजार विधान परिषदेत निवडणुकीत झाल आहे. आमच्याकडे ऑफर आहे. या गटाचे अध्यक्ष व्हा, एक मर्सिडीज घ्या, २ लाख रुपये महिना घ्या आणि २ कोटी नगदी घ्या. सध्याच्या श्रीमंत निवडणुकीत विधान परिषदेसारख्या सभागृहात मला एकही रुपया खर्च न करता आमदार होता आला ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच झाले, असे मिटकरी सांगितले.

 

 

Related posts

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

“विरोधी पक्षाविरोधात मोठे कारस्थान किंवा डाव रचला जात आहे का?”, संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल

Aprna

जावेद हबीब यांचा भाजप प्रवेश, मोदींसह दिग्गजांना नेटकऱ्यांनी दिला नवा लूक

News Desk