HW News Marathi
राजकारण

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा भाजपसरकारविरोधात हल्लाबोल…

मुंबई | कल्याण-डोंबिवलीच्या ६५० कोटी आणि स्मार्ट सिटीचं काय…फसव्या आणि अयशस्वी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाचा धिक्कार असो… अशा घोषणा देत कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजपविरोधात आज कल्याणमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

कल्याण-डोंबिवलीमधील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुपारी १२ वाजता कल्याण शिवाजी चौकामध्ये हे हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या हल्लाबोल आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, अर्जुनबुवा, कटारिया, सारिका गायकवाड, दत्ता वझे, परसनाथ तिवारी, संदीप देसाई, प्रल्हाद भिलारे, समीर वानखेडे, शैलेंद्र जोगदंड, निरंजन भोसले, प्रसन्न आचलकर, श्रीरंग भोसले, मनीषा बालसराफ आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती !

News Desk

अखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार

News Desk

मोदी सरकार २.० : १०० दिवसात काश्मीरमधील कलम ३७० रद्द, तीन तलाक प्रथा बंद

News Desk
राजकारण

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची सांत्वनपर मदत द्या !

News Desk

मुंबई | रावण दहनाचा कार्यक्रम बघत असलेल्या लोकांच्या गर्दीवर भरधाव ट्रेन आल्याने या रेल्वेखाली शंभरहुन अधिक लोक ठार झाल्याची अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसर मध्ये घडली आहे. हा रेल्वे रुळांवर झालेला सर्वात मोठं अपघात असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची तथा या अपघाततील मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित देण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

अमृतसर मधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद घटना आहे. मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.

रावण दहन चा कार्यक्रम रेल्वे रुळांजवळ कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला . फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वे रुळांवर उपस्थित बघ्यांच्या गर्दीला रेल्वेचा आवाज आला नाही.त्यात शंभरहून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे.या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…अकोला मतदारसंघाबाबत

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जाच्या आधारे अनिल देशमुख यांनी CBI न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

Aprna

पालघर निवडणुकांमध्ये युतीला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा

News Desk