HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रम

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या ३ ऑक्टोबर रोजी ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री फौजिया खान यांनी दिली आहे. फौजिया खान की, देशातील सद्यस्थिती पाहता संविधान धोक्यात असल्याचे समजते. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही सरकारचे नियंत्रण असल्याने लोकशाही धोक्यात आली असून संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फौजिया खान यांनी बैठक घेऊन ३ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थिती लावणार असल्याची माहिती खान यांनी दिली आहे. दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबादनंतर पुण्यातदेखील हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यानंतर औरंगाबाद आणि कोकण विभागातही हा कार्यक्रम करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या ईव्हीएम मशीन धोरणावरही त्यांनी टीका केली आहे. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, MSRDC, MMRDA, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, ” मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

News Desk

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

Aprna
देश / विदेश

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण

swarit

श्रीनगर | भारताने दोन वर्षापुर्वी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी एका चकमकी दरम्यान शहीद झाले. सिंह हे जम्मू-काश्मीरमधील तंगधार परिसरातील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी तैनात केलेल्या तुकडीत होते. या घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत सोमवारी संदीप सिंह यांना वीरमरण आले.

संदीप सिंह यांनी ४ पॅरा कमांडो पथकांच्या मदतीने तंगधार सेक्टरमधील गगाधारी भागात दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर त्यांच्या टीमने पुढे जाऊन दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला संदीप सिंह यांच्या पथकाने प्रत्यूत्तर देताना तीन दहशतवादी ठार केले. परंतु या गोळीबारीत सिंह यांना गोळ्या लागल्याने ते जखमी झाले. परंतु जखमी अवस्थेत साथीदारांना वाचविण्यासाठी गोळ्या झाडत राहिले. यावेळी दहशतवाद्यांनी झाडलेल्या एक गोळीत संदीप सिंह शहीद झाले. नायक संदीप सिंह याच्या पाश्चात पत्नी आणि ५ वर्षाचा मुलगा आहे.

Related posts

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

News Desk

काहीच वेळात ‘फनी’ चक्रीवादळ २०० किमी प्रतितास वेगाने ओडिसा किनारपट्टीला धडकणार

News Desk

वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

News Desk