HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसची स्तुती, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

मुंबई | “संभाजी भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय आहे. त्यामुळे काँग्रेससोबत युती करण्याची आमची इच्छा आहे, मात्र आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येऊ शकत नाही असे,” भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असले तरी त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंची जाहीर स्तुती करतात. त्यामुळे आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसचे कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धारेवर धरले. “आम्ही काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक आहोत. निवडणुकांसाठी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. परंतु काँग्रेसच्या मित्रपक्षांबरोबर आम्ही जाणार नाही,” असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी ओवेसी यांच्या एमआयएमबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे एमआयएमसोबत युती करून निवडणूक लढवणार असल्याचा आमचा निर्णय पक्का आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Aprna

“आणखी मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ म्हणजे…”,वेदांता प्रकल्पावरुन पवारांचा शिंदे सरकारला टोला

Aprna

…तर जनताच बंड करील | उद्धव ठाकरे

News Desk
देश / विदेश

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

मुंबई | दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय शिबीर पार पडले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकार आणि काँग्रेस सरकारवर निशाना साधला. या दरम्यान, भागवत यांनी देशाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

शिबीराच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी केंद्र सरकारसह विरोधी पक्षाला उद्देशून एक प्रश्न उपस्थित केला की राजकारणात स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसारख्या शब्दांना कशा प्रकारे पाहिले जाते ? यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, राजकारण हे लोक कल्याणासाठी व्हायला हवे .स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसाठी नाही.

पुढे बोलताना भागवत म्हणाले, जेव्हा राजकारणाचा मुख्य उद्देश केवळ सत्ता प्राप्ती असा होतो. तेव्हा ख-या अर्थाने विविध विषयांवर राजकीय पक्ष राजकारण करु लागतात. यावेळी महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा दाखला देत भागवत म्हणाले त्यांच्यासारखे काम केले तर अशा गोष्टींना वाव मिळणार नाही. तसेच पुढे बोलताना भागवत म्हणाले, संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही.

संघाचे मुख्य उद्दिष्ट केवळ नियमांचे पालन करणे हा आहे. लोक संघाच्या धोरणांचा फायदा घेतात. बुधवारी, संघाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी सांगितले की संघ अनुच्छेद 370 आणि 35 ए स्वीकारत नाही. त्यांनी सांगितले की अशी व्यवस्था योग्य नाही.

 

Related posts

जाणून घ्या…भाजपच्या विधान परिषदेच्या ४ उमेदवारांबद्दल ही माहिती 

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात घेतला मोठा निर्णय

Aprna

भारतात पाकिस्तानपेक्षाही उपासमारी वाढली !

News Desk