HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे राज्यभरात निषेध मोर्चे

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजपासून (१५ ऑक्टोम्बर) राज्यात निषेध मोर्चे काढण्यात येणार आहे. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. जसे लोडशेडिंग, इंधनाची दरवाढ आणि महागाईने जनता त्रस्त आहे, यावर सरकार काहीही उपाय-योजना करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी वारंवार करत आहे. त्यामुळे मोर्चे काढून सरकारला जागे करणे गरजेचे आहे. सरकारला तरी देखील जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून घेराव घालण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. हे आंदोलन २० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

राज्यात अनियमितपणे विजपुरवठा होत आहे. तसेच महागाईने जनता त्रस्त असून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये तरुणांना रोजगार उपल्बध करून दिला नाही. राज्यात अडीच हजार रिक्त पदे आहेत. तरुण दिवसेंदिवस बेरोजगार होत चालले आहेत. सरकारी नोकर्‍यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. या सगळ्यावर सरकार अजूनही गंभीर निर्णय घेतला नाही. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी मोर्चे काढणार आहे, असे पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिग्गज नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली, महाराष्ट्रात ‘चड्डी’चे राजकारण

News Desk

…तरीही उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का ?

News Desk

नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन अपक्ष आमदारांनी आणला अविश्वासाचा प्रस्ताव

Aprna