HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या बैठकीत १० जागांवरील उमेदवार होणार निश्चित

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत १० जागांवरील लोकसभेचे काही उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा, माढा, कोल्हापूर या जागांबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यनंतर दोन्ही काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठीकमध्ये जागावाटपाबबत चर्चा होणार आहे. कोणी किती जागा लढवायच्या, मित्र पक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणत्या आणि किती जागा सोडायच्या याबातही चर्चा होणार आहे. गेल्यावेळी लढवलेल्या काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat

OBC आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

Aprna

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk
महाराष्ट्र

संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

Gauri Tilekar

मुंबई | ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकातील संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रकाशक आणि लेखिकेने माफी मागितली आहे. सर्व शिक्षा अभियानात या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकातील मजकूर संभाजी महाराजांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात असल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला होता. या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे आणि नागपूर येथील प्रकाशक लाखे यांनी प्रकाशित केले आहे.

‘संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा मजकूर या पुस्तकात आहे.

सर्व शिक्षा अभियानात देखील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश आहे. कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आली होती. असा चुकीचा आणि अपमानास्पद मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे दुर्दैवी आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले होते.

Related posts

उठसूठ शरद पवारांवर बोलणार्‍या गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

Manasi Devkar

एकाचा मुदडा पाडून लुटला पेट्रोलपंप

News Desk

दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने सुनावले

News Desk