HW News Marathi
राजकारण

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

मुंबई | ‘निर्धार परिवर्तनाचा’ ही भूमिका घेवून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आणि महाडच्या चवदार तळयाच्या परिसरात पहिली सभा घेवून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ९ जानेवारीपासून परिवर्तन यात्रा सुरु करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारच्याविरोधात राज्यभर हल्लाबोलच्या माध्यमातून रान उठवले होते आणि या हल्लाबोल आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसादही जनतेने दिला होता. राज्यभर राष्ट्रवादीने हल्लाबोलच्या माध्यमातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते आणि आता परिवर्तन यात्रा काढून केंद्र व राज्यसरकाच्या कारभाराचे पुन्हा एकदा वाभाडे काढत तो कारभार जनतेपर्यंत पोचवला जाणार आहे.

केंद्र आणि राज्यसरकारचे अपयश लोकांसमोर मांडून लोकांच्यामध्ये जावून महाराष्ट्रात सर्व समाज संघटीत करुन भाजप-सेनेच्याविरोधात ही परिवर्तनाची यात्रा काढणार आहोत असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. सर्वव्यापी असे या परिवर्तन यात्रेचे स्वरुप असणार आहे.परिवर्तनाची भूमिका घेवून आता परिवर्तन अटळ आहे. हे महाराष्ट्रातील सर्व समाजाला आणि सर्व घटकाला नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजपच्या सरकारने जो भ्रमनिरास केला आहे ज्यांना फसवले आहे त्या सर्वांच्यासमोर जावून ही भूमिका मांडणार असल्याचा आमचा महत्वाचा भाग आहे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RamMandir : उध्दव ठाकरेंनी घेतले प्रभू रामचंद्रांचे दर्शन

News Desk

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज

News Desk

विधानसभेला आम्ही मनसेसोबत जाणार नाही !

News Desk
राजकारण

सरकारने कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे !

News Desk

मुंबई | “शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला.

“सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही जातो. त्यामुळे या अनुदानासहित राज्य सरकारने कांदा जिल्ह्याबाहेरही पाठवण्यासाठीही अनुदान द्यावे”, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

कांदयाची किंमत इतकी घसरली असताना सरकार किलोमागे फक्त दोन रुपये अनुदान देवून कसे परवडेल?नाशिकचा कांदा या अनुदानात गुजरात आणि दिल्लीपर्यंत कसा जाईल असा सवाल करतानाच सरकारने शेतकऱ्यांना वाढीव मदत दयावी, अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली आहे.

Related posts

शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळेल असे वाटत नाही !

News Desk

मला कमळासमोरचे बटण दाबायचे होते पण…!

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk