HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त आहे ? | जयंतराव पाटील

मुंबई | सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे. असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे. म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला आहे.

गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलने केली जात आहे. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. ३१ ऑक्टोबरला राज्यातील फडणवीस सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार असून सरकारच्या पाणी वाचवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना सर्वच फोल ठरल्या आहेत असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला आहे.

लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकार समोर आहे. सरकारचे हे अपयश आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता परंतु भाजप सरकार महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरत आहे. भाजप सरकारला लोकांची नाही तर फक्त निवडणुका जिंकायची चिंता आहे असा गंभीर आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

News Desk

नांदेड-मुंबई विमानसेवा 1 मे पासून सुरू

News Desk

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या !

swarit