HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त आहे ? | जयंतराव पाटील

मुंबई | सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे. असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे. म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला आहे.

गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलने केली जात आहे. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. ३१ ऑक्टोबरला राज्यातील फडणवीस सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार असून सरकारच्या पाणी वाचवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना सर्वच फोल ठरल्या आहेत असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला आहे.

लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकार समोर आहे. सरकारचे हे अपयश आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता परंतु भाजप सरकार महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरत आहे. भाजप सरकारला लोकांची नाही तर फक्त निवडणुका जिंकायची चिंता आहे असा गंभीर आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“पवार कधीच खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे…!” बोंडेंची पवारांवर बोचरी टीका

News Desk

९वी, ११वीच्या विद्यार्थ्यांना Promote करणार?, आज निर्णय होण्याची शक्यता

News Desk

मला पक्षाने विधानपरिषदेचे आश्वासन दिले आहे ते नक्की पाळले जाईल, मेधा कुलकर्णींचा विश्वास

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून जरी राज्यात परतले आहेत. परंतु अजूनही ते मंत्रालयात उपस्थित झालेले नाहीत. ते सध्या ते पूर्ण विश्रांती घेत असून सोमवारीपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील,अशी माहिती मिळत आहे.

“मनोहर पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येतील,” असे याआधीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ते सोमवारी व मंगळवारीसुद्धा कार्यालयात आले नाहीत. गेले अनेक दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकले नसून मंत्रिमंडळाची बैठकही गेल्या अनेक आठवडे घेण्यात आलेली नाही. काही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी बाय सर्क्युलेशन पद्धतीने मंत्र्यांकडे फिरत होते, ते मंजूर झाले आहेत.

मंत्रिमंडळातील एकूण तीन सदस्य आजारी असून ते मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे आता खातेबदलासाठी भाजपच्या एका मोठ्या गटाकडून मागणी होत आहे. मात्र पर्रीकर यांनी अजून तरी आजारी मंत्र्यांच्या खातेबदलाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही.

काहीच दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे जेव्हा तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचारासाठी गेले होते तेव्हा ‘पर्रीकरांनी आरोग्याच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे आणि आता दुसरा मुख्यमंत्री नेमला जावा’, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती. पर्रीकरांच्या सतत खालावणाऱ्या प्रकृतीमुळे भाजपने आता पूर्णवेळ तंदुरुस्त मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती.

Related posts

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

Aprna

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

शरद पवारांनी बोलावली बैठक

News Desk