HW News Marathi
राजकारण

पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील !

पंढरपूर । “भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटकं करायची आहेत ती करू द्या. पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील”, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर सोमवारी (१२ नोव्हेंबर) पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी मिरज दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की,”पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू”.

अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

‘सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ती नाटकं करुन घ्यावी. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत, याची शाश्वती मी देतो’,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे !

News Desk

कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची आता डिपॉजिट वाचविण्‍याचीच लढाई | आशिष शेलार

News Desk

‘क्रांती गाथा‘ हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल! – मुख्यमंत्री

News Desk
राजकारण

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | राफेल करारासाठी रिलायन्स कंपनीची निवड भारत सरकारने नव्हे तर आम्हीच केली होती, असे दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला राफेल करारासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत एरिक ट्रॅपियर बोलत होते. राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत एरिक यांनी दसॉल्टची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदींमुळेच रिलायन्स कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

काँग्रेस सत्तेत असताना देखील आम्ही भारतासोबत करार केले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे आम्हाला वेदना झाल्याची भावना एरीक यांनी व्यक्त केली आहे. रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीच्या क्षेत्राचा काहीही अनुभव नसताना देखील त्यांना राफेलचे कंत्राट दिल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असे विधान राहुल गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होते.

Related posts

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले! – एकनाथ शिंदे

Aprna

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा राम कदमांच्या निवासस्थानी निषेध मोर्चा

News Desk