HW News Marathi
राजकारण

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

नवी दिल्ली | राफेल करारासाठी रिलायन्स कंपनीची निवड भारत सरकारने नव्हे तर आम्हीच केली होती, असे दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला राफेल करारासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत एरिक ट्रॅपियर बोलत होते. राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत एरिक यांनी दसॉल्टची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदींमुळेच रिलायन्स कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

काँग्रेस सत्तेत असताना देखील आम्ही भारतासोबत करार केले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे आम्हाला वेदना झाल्याची भावना एरीक यांनी व्यक्त केली आहे. रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीच्या क्षेत्राचा काहीही अनुभव नसताना देखील त्यांना राफेलचे कंत्राट दिल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असे विधान राहुल गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदी बिनकामाचे, राहुल गांधींची बोचरी टीका

News Desk

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे म्हणजे काही गोष्टी लपवायच्या आहेत !

News Desk

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna
देश / विदेश

काबुल येथील सरकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला

News Desk

नवी दिल्ली | काबुल येथील सरकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ४३ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर जवळपास ३५० लोकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच अफगाण सुरक्षा दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले.

अफगाण सुरक्षा दलाचे जवान आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत अफगाण सुरक्षा दलांच्या जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश आले आहे. दहशतवाद्यांकडून काबुल येथील या सरकारी कार्यालयाजवळ कारबॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटानंतर भीतीने इतरत्र पळणाऱ्या लोकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. हा दहशतवादी हल्ला या वर्षी अफगाणिस्तानमध्ये झालेला सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

News Desk

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

News Desk