HW News Marathi
राजकारण

नितीश कुमार भाजपची साथ सोडणार ?

नवी दिल्ली | जनता दल युनायटेडचे नितीश कुमार लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपची साथ सोडतील, असा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. मोदींची लोकप्रियता कमी होत असल्यामुळे ते हा निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमार सत्तेशिवाय जगूच शकत नाहीत. २४ तासांच्या आत ते कुठेही पलटी मारु शकतात. लोकसभेला ६ महिन्यांचा अवकाश असल्यामुळे त्यांचा यू-टर्न निश्चित आहे, असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

नितीशकुमार यांना महाआघाडीत घेणार का? या प्रश्नावर दिग्विजय सिंह यांना विचारला असता त्यावर त्यांनी काहीही स्पष्ट उत्तर दिलेले नाही.नितीशकुमार यांच्यासाठी आता महाआघाडीचे दरवाजे बंद झाले आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावरही त्यांनी काहीच भाष्य केले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

News Desk

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

देशाची अर्थव्यवस्था संकटात, नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

News Desk
महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांमध्ये अडीच लाख पदे रिक्त

swarit

मुंबई | शासनाच्या विविध विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती झाल्यानंतर नोकर भरती न केल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. दरवर्षी किमान ५० हजार सरकारी कर्मचारी सेवा निवृत्त होतात. विविध विभागांमध्ये ६ लाख ९६ हजार ४१५ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा परिषदेतील पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. परंतु कित्येक वर्षांपासून मंजूर पदे भरण्यात आलेली नाहीत.

१९८९-९९ या काळामध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणलेल्या झिरो बजेटमुळे राज्यातील नोकर भरतीवर परिणाम झाला. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढ गेले आहे. सर्वाधिक पदे गृह विभागात रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक व पर्यावरण विभागाने आपली मंजूर पदे भरली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये किमान १ लाख कर्मचारी निवृत्त झाले असून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेकदा मागणी करून सुद्धा शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अशी खंत महाराष्ट्र शासनाने व्यक्त केली.

रिक्त पदे असलेली विभाग

  • मराठी विभाग – २१४ पदे
  • शासनाच्या सर्व विभागातील – १ लाख ३० हजार ५१
  • जिल्हा परिषदातील -२६ हजार ६९८ पदे

Related posts

ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार – वर्षा गायकवाड

News Desk

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

News Desk

नवाब मलिकांना पुन्हा धक्का! 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna