HW News Marathi
राजकारण

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळलेले चित्र दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २३ जागा, शिवसेना २४, भाजप १४ आणि इतरांना ७ जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि शिवसेना एकत्र आल्‍यास युतीची सत्ता येईल. अहमदनगरमध्ये महानगरपालिकेत एकूण ६८ जागांसाठी निवडणूक झाली असून सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३५ आहे.

त्यामुळे अहमदनगरच्या महापालिकेत नेमकी कोणा सत्ता येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सत्तास्थापनेसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना आणि भाजपला आघाडी करावी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर निवडणुकीतला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी झाला आहे. दरम्यान महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौरपदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

राज ठाकरे, महादेव जानकर यांच्या भेटी मागचे कारण काय ?

News Desk

गिरीश बापट यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली | उच्च न्यायालय

News Desk