HW News Marathi
राजकारण

मी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही | आव्हाड

मुंबई | “मी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही. फटाके आणि दिवाळी अतुट नाते आहे. मी लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर फटाके वाजवणारच. त्यासाठी मी परिणामही भोगायला तयार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले आहे. फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयाबाबात सर्वोच्‍च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तसेच ऑनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्‍च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासाचाच अवधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी वर्तविली आहे.

मध्यप्रदेशचे भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. हिंदू सणांच्या परंपरेत कोणालाही ढवळाढवळ करू देणार अशी तीव्र प्रतीक्रिया मालवीय यांनी आपल्या ट्विटद्वारे केली आहे. ‘मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार.सण साजरा करण्याची वेळ नसते म्हणून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री १० नंतर मी फटाके फोडणार आहे. त्यासाठी मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल , मी आनंदाने तुरुंगात जायला तयार आहे’, असे ट्विट करत त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्याच आव्हान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह मध्य प्रदेशात देखील बसपा-सपा यांची आघाडी

News Desk

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

News Desk

पंकजा मुंडे यांनी गुणरत्न सदावर्तेंची केली कानउघडणी

Manasi Devkar