HW News Marathi
राजकारण

आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान

मुंबई | मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला देखील आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी समाजाला आवश्यकतेपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आल्याने ते कमी करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आंदोलकांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली होती. मात्र, ओबीसी समाजाला दिल्या गेलेल्या आव्हानामुळे या समाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला दिल्या गेलेल्या आरक्षणाचा सर्वेक्षणाद्वारे तपस करून या समाजातील जातींचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा देखील १ डिसेंबर २०१८ पासून राज्यभरात लागू करण्यात आला. या आरक्षणाला कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटनेकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. त्यानंतर लगेचच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे, असे सांगत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी; राहुल गांधी पहिल्यांदा जॅकेटमध्ये

Aprna

“…आता तरी मला वाटत नाही”, शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या भाकितावर प्रतिक्रिया

Aprna

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच !

News Desk
मुंबई

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk

मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला बुधवार (१९ डिसेंबर) पुन्हा आग लागली आहे. कामगार रुग्णालयाला सोमवारी(१७ डिसेंबर) आणि बुधवार (१९ डिसेंबर) दोन वेळा लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१७ डिसेंबर)ला लागलेल्या भीषण आगीत १४६ जण जखमी झाले तर याच आगीत जखमी झालेले किसन नरावडे यांचा आज गुरुवारी (२० डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कामगार रुग्णालय आग प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रमी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Related posts

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

उपजिल्हाधिकारी कारले यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन – बबनराव घोलप

News Desk

बारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा धिंगाणा, कर्मचाऱ्यांना जबर मारहाण

News Desk