HW News Marathi
मुंबई

कामगार रुग्णालयाला पुन्हा एकदा आग

मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला पुन्हा आग लागली आहे. ही आग मीटर बॉक्सला लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.

या आधी कामगार रुग्णालयाला सोमवारी (१७ डिसेंबर) दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४० हून अधिक जण जखमी झाले होते.

संबंधित बातम्या :

दोन दिवसांपूर्वी नेमके काय घडले होते ?

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna

काळाघोडा फेस्टिव्हलवरील स्थगिती कायम

swarit

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk
राजकारण

छत्तीसगढमध्ये भाजपने केली जाहीरनाम्याची घोषणा

swarit

रायपूर । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने छत्तीसगढमध्ये जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने नवीन घोषणा केल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमधल्या एका हॉटेलमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने या जाहीरनाम्यामध्ये गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले आहे.

“नक्षलवाद्यांना क्रांतीचं माध्यम समजणारा पक्ष छत्तीसगडचं काहीही भलं करणार नाही. भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून छत्तीसगडमध्ये चौथ्यांदा सत्तेत येईल. आजारी राज्य असलेला छत्तीसगड आता वीज आणि सिमेंट उत्पादनाचं केंद्र झाला आहे”, असे शहा म्हणाले आहेत. काँग्रेस शेतक-यांना फक्त व्होट बँक समजते अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी टीका केली आहे. यावेळी भाजपध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच डॉ. रमण सिंह, कॅबिनेट मंत्री अमर अग्रवाल यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे

– आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास अंबिकापूर आणि जगदलपूरमध्ये मल्टि स्पेशालिटी रुग्णालय बनवणार

– स्मार्ट कार्ड धारकांना ५० हजारांहून १ लाख रुपये युनिर्व्हसल हेल्थ स्कीमअंतर्गत देण्यात येणार

– पत्रकार कल्याण बोर्डाची स्थापना केली जाईल

– छत्तीसगढमध्ये फिल्म सिटीचं निर्माण करणार

 

Related posts

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत

News Desk

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk