HW News Marathi
राजकारण

कुणाकडे किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण; आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला

मुंबई : पुन्हा एकदा खोक्यांचा मुद्दा काडत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राचं राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला आहे. खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मात्र, रवी राणा यांनी देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मातोश्रीवर (Matoshree) बसून खोक्याचं राजकारण सुरू केलं असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनच खोक्याची प्रथा सुरू झाल्याचा टोला राणा यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरेंचा टोला

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

 

रवी राणांचं प्रतिउत्तर
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या टीकेला रवी राणा यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेत (BMC) जे खोक्याचं राजकारण सुरू झालं, ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच सुरू केलं. मुंबईच्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना किती खोके पोहोचवले, हे संपूर्ण मुंबईमधील जनतेला माहीत आहे. खोक्याशिवाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं पान हलत नाही असं राणा यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aprna

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

News Desk

विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Aprna