HW News Marathi
राजकारण

आता यु टर्न म्हणजे उद्धवजी टर्न !

मुंबई | नागपूर येथील राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या शेतकऱ्यांना २ लाखपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, सरकारच्या या कर्जमाफीच्या निर्णयानंतर भाजपने सभात्याग करत आपली नाराजी व्यक्त केली. “महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली”, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर, आता पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. “यु टर्न म्हणजे आता उद्धवजी टर्न”, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“राज्य सरकारने केलेली २ लाखांची कर्जमाफी ही जरी स्वागतार्ह असली तरीही त्यांनी जो शब्द दिला होता त्यादृष्टीने त्यांनी ही फसवणूक केली आहे. त्यामुळे आता युटर्नचा अर्थ उद्धवजी टर्न असा झाला आहे, असे मी म्हणेन. कारण, उद्धवजी आपण दिलेल्या प्रत्येक शब्दातुन ते माघार घेतात. ते प्रत्येक गोष्टीत युटर्न मारतात. त्यांनी असे म्हटले होते कि, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. मात्र, त्यांनी हे आश्वासन पाळले नाही. मी उद्धवजींना असा सल्ला देईन कि त्यांनी सर्व टर्म्स समजून घ्याव्यात. कारण, ही पूर्ण फसवणूक सुरु आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक त्रुटी सांगितल्या.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी २१ डिसेंबर रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात दिली आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. महात्मा फुले योजनेतून शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा | सुप्रिया सुळे

News Desk

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

News Desk

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk