HW News Marathi
राजकारण

मोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही

मुंबई | ‘मोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले तरीही त्यांच्यासमोर निभाव लागणार नाही,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘सकाळी एक बोलतात तर रात्री दुसरचं बोलतात’, असाही आरोप फडणवीस यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षावर केला.

आमच्या सरकारने अनेक बेरोजगारांना नोक-या दिल्या आहेत. खोटे बोला पण रेटून बोला अशी सध्या काँग्रेसची अवस्था, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेसाठी काम आणि गडकरी यांनी रस्त्यांची कामे केली.

मोदींच्या जनधन योजना, उज्वला योजना यांसारख्या योजनांनी देशाचा विकास होत आहे. विकासात आमची कुणी बरोबरी करु शकत नाही म्हणून सरकारवर आरोप केले जात आहेत. जोपर्यंत लोकशाहीची जपणूक करत नाहीत तोपर्यंत यांना संसदेत पाठवायचे नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आषिश शेलार, खासदार पूनम महाजन आणि स्थानिक आमदार पराग अळवणी हे देखील मुंबईच्या विले पार्ले येथे गुरुवारी उपोषणाला बसले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Aprna

“वापरा आणि फेका ही निती भाजप सर्वत्र वापरतात”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna