HW News Marathi
राजकारण

वेळीच पायबंद घातला असता तर आज पक्षावर ही वेळ आली नसती !

मुंबई | लोकसभेच्या निकालानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी २६ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला आता पद्मसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सुप्रियांनी जर माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती”, असा टोला पद्मसिंह पाटील यांनी लगावला आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह पद्मसिंह पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. राणाजगजितसिंह पाटील यांनी जेव्हा त्यांच्या मतदारसंघात आपल्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. त्यावेळी पद्मसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र, भाजपच्या तिसऱ्या मेगाभरतीत केवळ राणाजगजितसिंह पाटील यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर देखील पद्मसिंह पाटील यांनी भाष्य केले आहे. “मी तब्येतीच्या कारणामुळे २०१४ सालापासून राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी टीका करण्याची आवश्यकता नाही”, असेही पदमसिंह पाटील म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी केली घणाघाती टीका

“आजकाल वंशाचे दिवे असणाऱ्या वडिलांचे काय होईल ? यापेक्षा स्वत: चा विचार करतात. आपल्या करियरसाठी ते आपल्या वडिलांना ढकलून देण्यासही तयार होतात. अशा वंशांच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या आपल्या बापाला कुणापुढे झुकायला तरी लावत नाहीत. कोणत्याही वडिलांना असा दिवस बघायची वेळ येऊ नये. ज्या वडिलांचे उभे आयुष्य ताठ मानेने जगण्यात गेले, आज त्यांची अवस्था पाहा. मात्र, वडिलांची घालमेल मुलाला कळत नाही. ठेकेदरीसाठी मुलाने वडिलांना दुसऱ्या पक्षात जायला भाग पाडले”, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk

संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

Aprna

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk