HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंच्या सभेत भाडोत्री माणसे, नितेश राणेंचा आरोप

मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवलीत गुरुवारी (१८ एप्रिल) प्रचारसभा झाली. उद्धव यांच्या या सभेत गर्दी वाढविण्यासाठी मुंबईहून भाडोत्री माणसे आणल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी या संबंधीचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव यांच्या या सभेसाठी कोल्हापूर, मुंबईसह अन्य अनेक ठिकाणाहून माणसे आणल्याचे समजते.

आपण उद्धव यांच्या सभेसाठी मुंबईहून ५० गाड्या भरून माणसे घेऊन आल्याचे व्हिडिओतील व्यक्ती सांगतो आहे.नितेश राणे यांनी याबाबतचे ट्विट करत शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत एकाच मतदारसंघात २ सभा घेतल्या. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी आपण लोकांच्या या प्रचंड प्रतिसादाने भारावून गेल्याचे देखील म्हटले. मात्र, लोकांची ही गर्दी खरी नसून त्यासाठी भाड्याने माणसे आणण्यात आल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे ‘ते’ ट्विट, संजय राऊतांकडून ‘रिट्विट’

News Desk

राहुल गांधी इटलीत जा !

News Desk

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk