HW News Marathi
क्राइम

आर्थर रोडजेलमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

मुंबई : 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्याची रवानगी आर्थर रोडमध्ये केली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या बॅरेकमध्ये दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला ठेवलं होतं, त्याच बॅरेक क्रमांक 12 मध्ये मल्ल्याला ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

विजय मल्ल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षितते संदर्भातला अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र…

News Desk

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

Aprna

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1400 कोटीचे ड्रग्ज केले जप्त

Aprna
क्राइम

वडिलांनीच केली मुलीची हत्या

swarit

सोलापूरतेलंगणामधील ऑनर किलिंगच्या घटनेने संपुर्ण देशाला हदरवून टाकले होते. या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झाली आहे. शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. वडील आणि आई या दोघांनी आपल्या मुलीची हत्त्या केली. आरोपी वडील विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केले आहे.

अशी झाली अनुराधाची हत्या

अनुराधा ही कर्नाटकमध्ये वैद्यकीय( बी.ए.एम.एस.) शिक्षण घेत होती. तिने शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केले होते. अनुराधाच्या वडिलांना हे कळताच ते तिला कर्नाटकातून घरी घेऊन आले. आणि अनुराधाचे मामा बाळासाहेब म्हमाणे हे बोराळमध्ये राहत होते. अनुराधाला तिच्या वडिलांनी मामाच्या घरी सोडून आले. थोड्या दिवसांनी अनुराधाची तोंडी परीक्षा असल्याचे कारण सांगून तिला बोरालमधून ४ ऑक्टोबरला घरी घेऊन आले. अनुराधा ५ ऑक्टोबरला शेतात हत्या केल्यानंतर तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यात चिठ्ठीत लिहले होत की, “माझ्या आई-वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बर-वाईट झाल्यास माझ्या आई वडिलांना जवाबदार ठरवा,” अनुराधाच्या मामाने या घटनेची तक्रार पोलिसांना केली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Related posts

अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या 36 तासात शोधून काढले

News Desk

गळफास घेवून तरुण शेतक-याची आत्महत्या

News Desk

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

News Desk