HW News Marathi
राजकारण

“देव पाण्यात बुडवित बसलेली लोकं आता पक्ष बुडवायला निघाले,” उद्धव ठाकरेंचा आरोप

मुंबई | “देव पाण्यात बुडवित बसलेली लोकं आता पक्ष बुडवायला निघाले आहेत,”  असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत ‘सामना’चे (saamana )कार्यकारी संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज (26 जुलै) सकाळी 8.30 वाजता प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीत राऊतांनी  उद्धव ठाकरेंच्या मानेवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या काळात शिंदे गट तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या मानेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे माझे हात पाय हालत नव्हते, माझी बोटे हालत नव्हती. मला टेंशन होते की, कुठे डास आणि मुंगी चावली तर खाजवायचे कुसे हा एक वेगळा आणि विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होते की, काही जण मी बरा व्हावा म्हणून देवाकडे अभिषेक  करत होती. तर काही जण मी असाच रहावा म्हणून देव पाण्यात बुडवित होती. देव पाण्यात बुडवित बसलेली लोके आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. आणि तेव्हा हे पसरविले जात होते, हा काय पुन्हा उभा राहणार नाही, आपले काय होणार, तुमचे काय होणार. म्हणजे ज्या काळामध्ये पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख कुटुंबप्रमुखाची शस्रकिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात होत होत्या. नाही म्हटले तरी हे एक वैदनादायी सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती. पक्ष सांभाळायची नंबर 2 चे पद होते, पक्ष सांभाळायला पूर्ण विश्वास दिला होता. विश्वासघात करायला तुम्ही मी हॉस्पिटलमध्ये असताना, माझी हालचाल बंद होती. तुमची हालचाल जोरात होती.”

संघर्षसाठी शिवसेना जन्माला आली

तुम्ही आता ज्या संघर्षमय काळखंडातून जात आहात. यांची कधी अपेक्षा केली होती, राऊतांनी विचरल्यावर प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शेवटी शिवसेना आणि संघर्ष हे तर एकएमेंकांच्या पाचविला पुजलेले आहेत. शिवसेना ही एक तळपती तलवार आहे. ती जर म्यानात ठेवली. तर ती गंजते, त्यामुळे ती तळपलीच पाहिजे, आणि तलवार तळपते म्हणजे संघर्ष आलाच. याचा अर्थ अर्थथी कोणी घेऊ नये की, तलवारीने वार करा, असे नाही म्हटले मी, संघर्षसाठी शिवसेना जन्माला आली. त्या वेळेला मराठी माणसासाठी, भूमिपुत्राच्या न्याय, हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यानंतर हिंदुत्वासाठी शिवसेना लढली. ते 92-93 साली असेल किंवा कधीही असेल. त्यामुळे शिवसेना आणि संघर्ष असेल. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचे ब्रीध वाक्य आहे.”

संबंधित बातम्या

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

मदन मोहन मालवीय यांच्या स्मारकास अभिवादनानंतर पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’ सुरू

News Desk

पंतप्रधानांच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk