HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या…संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा होता. तर देशभरात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. आज पार पडलेल्या चौथ्या टप्य्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६०.२७ % मतदानाची नोंद झाली आहे. तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच ४५.४०% मतदानाची नोंद झाली आहे.

राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

लोकसभा मतदार संघ

लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणूक २०१४

नंदुरबार ६०.२७ % ६६.७७ %
धुळे ५१.१५ % ५८.६८ %
दिंडोरी ५७.९० % ६३.४१ %
नाशिक ५२.५४ % ५८.८३ %
पालघर ५६.९६ % ६२.९१ %
भिवंडी ५०.९५ % ५१.६२ %
कल्याण ४५.४० % ४२.९४ %
ठाणे ४८.५६ % ५०.८७ %
मुंबई उत्तर ५६.७२ % ५३.०७ %
मुंबई उत्तर पश्चिम ५०.३७ % ५०.५७ %
मुंबई उत्तर पूर्व ५१.५९ % ५१.७० %
मुंबई उत्तर मध्य ४७.११ % ४८.६७ %
मुंबई दक्षिण मध्य ५१.४५ % ५३.०९ %
मुंबई दक्षिण ४७.९६ % ५२.४९ %
मावळ ५१.३५ % ६०.११ %
शिरुर ५१.२५ % ५९.७३ %
शिर्डी ५५.२० % ६३.८० %
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाककडे आणि दहशतवाद्यांना वठणीवरच आणा! 

swarit

तुम्ही तुमच्या श्रीमंत मित्रांना पैसे वाटा, मी गरिबांना वाटतो !

News Desk

राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून गप्पू झाले आहेत !

News Desk